तरुणांमध्ये योग्य संस्कार रुजवण्याकरीता भागवत सप्ताहाचे महत्वाचे योगदान*…

Uncategorized
Unique Multiservice
Share

*तरुणांमध्ये योग्य संस्कार रुजवण्याकरीता भागवत सप्ताहाचे महत्वाचे योगदान*… महेंद्र ब्राह्मणवाडे

Health Insurance

गडचिरोली :: देशाचा भविष्य हा तरुणाच्या हातात आहे, मात्र बहुतांश तरुण हे व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुणांचे व देशाचे भविष्य हे धोक्यात असून त्यांना योग्य मार्गांवर आणणे काळाची गरज आहे आणि त्यामध्ये योग्य संस्कार रुजविण्याचा काम भागवत सप्ताहाच्या माध्यमातून होऊ शकतो असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
मुरखळा (माल)तालुका चामोर्शी येथे भागवत सप्ताह समरोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष गडचिरोली मनोहर पोरेटी,सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली राजेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस गडचिरोली नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले,जतेंद्र मुनघाटे, हं. भ. प. नागापुरे महाराज, विजय लाड, राजेश नैताम सह इतर पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठीत व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
श्री विठ्ठल आश्रम मूरखळा येथेहं. भ. प. नागापुरे महाराज यांच्या मार्गदर्शनात दररोज नित्यनियमाने हरीनाम पाठ होत असते व दरवर्षी 200 युवक पंढरपूर ला वारीकरीता जात असतात या वारकऱ्यांना खासदार डॉ. नामदेव किरसान आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे कडून जेवनाच्या सोयीकरीता जेवणाचा संच मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *